शनिवार, २० जानेवारी, २०१८

*ओळख*

*आेळख*

  .   आपल्याला आयुष्यभर  सावली प्रमाणे सोबत करणारी असते ही आपली आेळख....कधी विचार केलाय का आपण बारकाईने ,आेळख ही नेमकी काय चीज आहे ?
    या सृष्टित पहिला श्वास घेतल्या बरोबर या भूतलावर आपली अशी एक खास जागा आपण व्यापून ठेवत असतो.....अमक्याचा मुलगा किंवा मुलगी,तमक्याची आणखी कोणीतरी..... नात्यांची लेबलं लाऊन सुरू झालेली ही आेळख परेड, आपण वयाने जसजसे वाढत जातो तशी आपल्यातील गुण,अवगुण,कलाकौशल्य बुध्दिमत्ता अशा गोष्टींशी हातमिळवणी करत ही आेळख वाटचाल करत रहाते आपल्या वाढीच्या गती बरोबर .

   आपणही सतत धडपडत असतोच की,आपल्यातील सकारात्मक वैशिष्ट्यां बरोबरच आपली आेळख तयार व्हावी या साठी....ती कायमच असावी म्हणूनही झटत असतोच.....किंबहुणा तसा प्रयत्न आपण आपल्या शेवटच्या श्वासा पर्यंत करत असतो.... ही ओळख या नाण्याची एक बाजू झाली....
    पण इतरांच्या नजरेतून सुध्दा आपल्या  नकळत ही आेळख बनत जाते हे पुर्ण सत्य नाकारता येणार नाही...

   तिला चांगली किंवा वाईट दोन्हीही बाजू असू शकतात.

अगदी काल परवाचीच गोष्ट ,माझ्या एका मैत्रिणीशी च्यॅटिंग करताना आम्हाला नव्यानेच शोध लागला की,तिचे 'हे' आमचे शाळामित्रच आहेत ....त्यांची आेळख पटवून देताना ती अगदी सहज म्हणाली,"अगं ते फार खोडकर होते लहाणपणी....म्हणून सगळेच आेळखतात त्यांना" .अर्थातच शाळेत असताना असणारी खोडकर पणाची त्यांची आेळख त्यांच्या हुशारी मूळे एका प्रतिष्ठित वकिला मध्ये बदलली होती....

         काही जणांना समोरच्या व्यक्तीचा चेहरा वाचता येतो.....म्हणजे, तो कसा असेल? स्वभावाने? प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा एक विशिष्ट सूर असतो....ज्या मूळे त्याच्या संबंधी आपण कांही तरी अंदाज बांधू शकतो....समजा एखादी व्यक्ती आपल्या नजरेला नजर देऊन बोलतो आहे असे लक्षात आले तर,तो आत्मविश्वास नि सच्चेपणाने बोलतोय म्हणजेच तो खरा असल्याची ही त्यांची आेळख...याउलट तो आपली नजर टाळत असेल तर ,नव्व्याण्णव गोष्टी बाद असण्याचीच शक्यता जास्त म्हणजे तो खोटरडा अशी आेळख बनू शकते...

         एखादा प्रामाणिक पणे आहे तसे शब्दांकन मांडत असेल तर,तो निरागस आणि मनाची निरागसता ही त्याची आेळख बनते....पण दुसरा कोणी त्याच गोष्टीला आणखी मसाला लाऊन चविष्टपणे त्याच गोष्टीचे वर्णन करत असेल तर,ती व्यक्ती "गप्पीष्ट"या पठडीत जाऊन बसते.....बरेच जण काहीही न बोलता आपल्या कृतितून सफलता प्राप्त करत आपली आेळख निर्माण करतात त्या मूळे ते "मेहनती" अशा स्वरूपात आपली आेळख सा-या  समोर आणतात...

               स्वतःच्या कला कौशल्यावर ओळख बनवणार्यात चित्रकार,लेखक यांच्या पासून ते गायक , वादक,खेळाडू इ.अनेक जण येतात...पण आपल्या कलेचे सातत्य कायम ठेवत ते बाकी लोकांच्या दृष्टीक्षेपात येणे गरजेचे असते....

          चेहर्यावरून आेळख ठरवण्यात कधी कधी गल्लत होऊ शकते....
प्रत्यक्ष सहवासातून समोरच्या माणसाची आेळख व्यक्ती गणिक बदलू शकते...

        बुध्दिमत्तेवरून बनणारी आेळख चिरःकाल टिकणारी असते...सर्वांत आनंद देणारी नि स्वभिमानाने मिरवणारी आपली आेळख म्हणजे आपल्याला आपल्या मुलांकडून ,त्यांच्या सकारात्मक गुणांवरून तयार झालेल्या आेळखीतून आईवडिलांना मिळते ना ती!..'ते'नाही का ?अमुक एका मुलाचे किंवा मुलीचे आईवडिल ? अभिमानाने उर भरून आणणारी ही आेळख आकाश ठेंगणे करणारी ठरते त्यांच्या साठी...आपल्या जगण्याचे सार्थक झाल्याची जाणीव निर्माण करते ती ओळख .....कृतकृत्यतेचे मोकळे श्वास देते ती ओळख.....

   तात्पर्य __आपण आपली आोळख स्वतः बनवत असताना किंवा दुसर्यां कडून ती नकळत बनली जात असताना आपण सन्मार्गावरच पावले टाकत चालणे केंव्हाही शहाणपणाचे असते........

  *नंदिनी म.देशपांडे*

nmdabad@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा