शनिवार, २३ एप्रिल, २०२२

प्रवास वर्णन...नॉर्थईस्ट थ्री सिस्टर्स सहल....

🎍आमची नॉर्थईस्ट, थ्री. 
             सिस्टर्स सहल 🎍

©️लेखिका---
नंदिनी म. देशपांडे. 

पुणे ते गोहाटी प्रयाण....
-------------------------
 पुण्याच्या विमानतळावरुन रात्री अडीच वाजता निघालेलं आमचं फ्लाईट अडीच तासात,म्हणजे सकाळी साडेपाच वाजता गोहाटीत पोहोंचले...गम्मत म्हणजे,सकाळी पावणेपाच वाजताच आकाशात तांबडं फुटलेलं होतं...
अरे बापरे!आता तर चक्क उजाडलंयं की...रात्रभर न झालेली झोप आता कशी भरुन काढणार?अशक्यच होतं...
वाहन कोणतंही असो, प्रवासात झोप न येणं किंवा आलीच ती,तर तिला पिटाळून लावणं हे मला कसं काय जमतं हे कोडं आणखी मलाच सुटलेलं नाही...
नवीन ठिकाणी जाण्याची उत्सुकता, भवताल निरखण्याची  क्षमता आणि सोबतच चालू असणारं विचारांचं चक्र या गोष्टी कारणीभूत असाव्यात यासाठी असं वाटतं...
     आता रात्रीच्या वेळेस मिट्ट काळोखात काय डोंबल दिसणार भोवतीचे?असा प्रश्न बाकीच्यांना पडणं अगदी स्वाभाविक आहेच...पण मला त्या मिट्ट काळोखात सुध्दा खूप काही दिसत होतं...सुरुवातीला उड्डाण घेईपर्यंत विमानतळावर रेखाटलेली रंगीबेरंगी दिव्यांची शिस्तीत काढलेली रांगोळी, वैमानिकाचे विमानाची दिशा बदलत नेण्याचे कसब,सवयीनं लक्षात येणाऱ्या आवाजावरुन आता विमान उड्डाण घेईल असे सांगणारे क्षण आणि एकदा उड्डाण घेतल्यानंतर शहरभर पसरलेलं लाईटच्या दिव्यांची निरनिराळी लहान होत बारीक बारीक होणारी मोहक आरास!काय सुंदर दिसतं हे दृश्य!
आपण अधांतरीच आहोत आता ही मनाला झालेली जाणीव थोडी कावरी बावरी करते आपल्याला, पण सुंदर,हसतमुख आणि गोडगोड बोलणार्‍या हवाईसुंदरींची शिस्तीत चाललेली लगबग लगेच आपले लक्ष वेधून घेतेच...
  तर,आसाम,मेघालय आणि अरुणाचल प्रदेश अशी आखणी होती आमच्या टूरची...
       
      गोहाटीतून  सुरु झालेल्या प्रवासाच्या चकचकीत रस्त्यांवर दुतर्फा उंचच उंच आणि सरळसोट वाढत चालेल्या उत्तम प्रतिच्या बांबूची झुडपं गर्दी करत बांबूचं जंगल बनवत आहेत हे लगेच लक्षात येत होतं...हिरवेगार अगदी सरळसोट बांबू आणि त्याची अणिकुचिदार पानं मनाला भुरळ घालत होती...त्यावर डोलणारी पिसासारखी तुरे म्हणजे आपल्याला घर स्वच्छतेसाठी झाडू बनून मदत करणारी केरसुणी हे लगेच लक्षात आले माझ्या...
आसामातील
    बांबू भारतात सर्वदूर पर्यंत आणि परदेशातही निर्यात होतात अशी त्यांची ख्याती आहे....
ठिकठिकाणी बांबूपासून बनवलेल्या सुंदर अशा आकर्षक वस्तू मनाला मोहित करत रहातात...बांबूपासून बनवण्यात येणाऱ्या वस्तूंमूळे आसाम राज्यातील लोकांना  मोठ्या प्रमाणावर कुटिरुद्योगाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत हे मात्र खरे...

   गोहाटी ते शिलॉंग 
-------------------------
    दुपारच्या जेवणानंतर गोहाटीत पाणी पिल्यानंतर आपण खूप मोठ्या अशा एक महत्वाच्या,म्हणजे 'ब्रह्मपुत्रा' नामक सरितेचं पाणी प्यालो आहोत,ही जाणीव  समाधान देऊन गेली...शहरातून प्रवास करत करत आम्हाला मेघालय ची राजधानी शिलॉंग गाठायचे होते...चार तासांचेच अंतर एका राज्यातून दुसर्‍या राज्यात प्रवेश करण्यासाठी!
    खेळीमेळीत प्रवास चालू असताना आल्हाददायक अशा पर्वतीय पहाडांची प्रवासात साथ चालू झाली,आणि लगेच आपण मेघालयात प्रवेश केलाय याची ग्वाही मिळाली....
वातावरणात होणारा बदल लक्षात येऊ लागला होता...

एव्हाना बांबूच्या झुडूपांची संगत कमी कमी होत होती...पहाडांवर इतरही अनेक प्रकारची हिरवीगार झाडं गुण्यागोविंदाने डोलत होती...
     शिलॉंग,मेघालयाच्या राजधानीचं शहर....
येथे प्रवेश करण्यापूर्वी रस्त्यातच आम्ही कृत्रिम पध्दतीने बनवलेल्या सर्वात मोठ्या अशा "उमिअम"लेक, मध्ये जो डोंगरांच्या कुशीमध्ये विजनिर्मिती साठी बनवला गेलाय...तर या तलावात नजिकच आलेल्या सुर्यास्ताच्या साक्षीनं  शांत वातावरणात मस्तपैकी बोटिंग करत झुळूझुळू पाण्यावर हळूवार तरंगत आनंद घेतला...सोनेरी उन्हाची पाण्यावर शिंपण करत,अस्ताला जाणारा दिनकर डोळ्यात साठवून घेतला...
रात्रीच्या जेवणानंतर  आदल्या रात्री न झालेल्या झोपेने आम्हाला तिच्या अधिन करवून घेतले...

'मेघालय' मेघांचं ढगांचं भांडार असणारा प्रदेश, भारताच्या अती पूर्वेकडील राज्यांपैकी एक....कित्तेक वर्षे या राज्यांमध्ये पर्यटनाला येण्याची हिम्मत कोणी करत नव्हते...भौगोलिक दृष्टिने लहरी, बऱ्याच लांब आणि अधुनिक सुविधांशी फारशी हातमिळवणी न केलेल्या या प्रदेशात यावयास कोणी धजावत नसावे बहूतेक....
   हिमालयिन डोंगरांच्या रांगांमध्ये वसलेला आणि काळ्याशार मेघांचे पांघरुण लपेटून राहाणारा हा प्रदेश...येथील माणसं अतिशय साधी, सोज्वळ सभ्य असावेत असेच जाणवले...
सुपारीच्या उंचच उंच झाडांनी वेढलेला हा प्रदेश भरभरुन नयनसुख देणारा असाच...पाऊसाला केंव्हाही झेलणारा आणि पाऊस पडला की थंडीशीही गट्टी करणारा असा....
प्रवास चालू असताना, मेघालयात, लग्न जुळवण्यासाठी मुलाकडची मंडळी मुलीसाठी सांगून येते, किंबहूणा मुला कडचे मुलीकडच्यांना हुंडा देतात आणि मुलगा मुलीच्या घरी जाऊन घरजावई बनून रहातो...छोटा मोठा व्यवसाय करतो असे समजले...मुलगी मात्र या घरची कर्ती स्त्री  असते...हे ऐकून आश्चर्य वाटलं!

    मनसोक्तपणे आपल्याच नादात वाकडी तिकडी वाढलेली हिरवीगार झाडं वेली, मोठमोठी  वृक्ष आपल्या अंगाखांद्यावर खेळवणारी भुमी, मेघालया च्या रुपानं पृथ्वीतलावर अवतरली आहे असे म्हणता येईल...

    मेघालयाच्या मातीची पायधूळ आपण अनुभवली की, निसर्गाच्या तांत्रिक रुपाची प्रचिती येते...
"माणसानं यशाची कितीही शिखरं काबिज केलेली असो पण त्याने आपले पाय मात्र  आपल्या मातीतच घट्ट रोवून ठेवावेत", अशी एक म्हण आहे मराठीत...
मेघालयातील मोठमोठी पण अस्ताव्यस्त पसरलेली,वनराजी बघून ही म्हण तेथील वृक्षांनी शब्दशः आमलात आणली आहे असे म्हणता येईल...

"लाईव्हरुट्स ब्रिजेस" हा शब्द आपल्या कानावरुनही गेला नाही कधी...पण या राज्यात घनदाट वनराजींमध्ये माणसांसाठी सोय म्हणून की काय, निसर्गातूनच असे वर्षानूवर्षांपासून जीवीत असणाऱ्या झाडांनी,वृक्षांनी आपली मुळं पसरवत,नैसर्गिक पुलांची केलेली बांधणी दिसून येते.....कितीतरी संख्येनं तयार होत, आजही ती जीवीत अवस्थेतच वापरली जातात...
   निसर्गाने मानवाला दिलेला हा अनमोल ठेवा तेथील शासनानेही जसा आहे तसा जपलाय...
काही दुमजली पुल आहेत तर बाकीची एकेरी, पण आपण त्यावरुन चालत जाताना खरोखरच थक्क व्हायला होते...
आमचं दुसर्‍याच दिवशीचं आकर्षण हे होतं आणि तो बघण्याची उत्सुकता ताणलेली होती...

ठरल्या प्रमाणे सकाळच्या उत्साहवर्धक मनानं, निसर्गाच्या कुशीतून फेरफटका मारण्यासाठी आम्ही दाट जंगलामध्ये प्रवेश केला...नैसर्गिक स्वरुपात पाऊलवाटेने तयार झालेल्या ओबडधोबड रस्त्यावरुन खरं म्हणजे माणसालाच हल्ली सवय राहिली नाहीए अशा रस्त्यांची...
पण, पण येथे मात्र, "अरे आम्ही या जंगलाचे राजे,येथे आमचेच राज्य असणार ना?"असा प्रतिप्रश्न करत डौलाने आपल्या पानांची सळसळ वाजवत आमच्यावर दाट सावली धरणारी, मोठी मोठी उंच वाढत गेलेली झाडंच आम्हाला चालताना तोल सावरायला आधार देत होती...
समुहाने आलो होतो याठिकाणी म्हणून बरे झाले, पण एकट्या दुकट्याला हिंमत नसती झाली ईकडे येण्याची!असे वाटून गेले क्षणभर!
आणि चालत असतानाच जाणवले, अरे खाली खोल ओढा असावा...थोड्याफार साठलेल्या पाण्याच्या खूणा दिसल्या तेथे... पावसाळ्यात पाण्याच्या माऱ्याने निरनिराळे आकार धारण करत, पहुडलेल्या काळ्या कुळकुळीत दगडांमधून कसरत करत उतरायचे होते आम्हाला...हा विचार मनात घोळत असतानाच आम्ही दोन्ही बाजूंनी झुकत परस्परांत मिसळून घनदाट सावली धरणाऱ्या एका पुलावरतून चालत आहोत आपण आणि हाच तोच झाडांनी (निसर्गाने) माणसाच्या सोयीसाठी बांधलेला पूल आहे हे लक्षात आले...
 या निसर्गासमोर अक्षरशः नतमस्तक व्हायला झाले...

    निसर्गाची ही किमया डोळ्यात साठवून ठेवताना मोबाईल मध्ये साठवण्याचा मोह अजिबात आवरता आला नाही...
      निसर्गाशी अतिशय जवळीक साधणाऱ्या या राज्यात, मेघालयात "मॉलिंनॉंग" नावाच्या एका छोट्याशा खेड्याला भेट दिली आम्ही.....
या मॉलिंनॉंग चे महत्व यासाठी की, हे एशियातील सर्वांत जास्त स्वच्छता राखलेले खेडे म्हणून प्रसिद्धीस आलेले आहे...आणि ते तसेच होतेही...निसर्गाच्या याच सान्निध्यात घरगुती पध्दतीने बनवलेले दुपारचे जेवण घेऊन आमची रसना तृप्त झाली...
       तेथेच थोडी भटकंती करत शतपावली साधली...

 या नंतर मग "डावकी"नावाचे दुसरे एक खेडे आम्ही गाठले...तेथे "ऊमन्गॉट", नावाची अतिस्वच्छ,नितळ पाणी घेऊन वाहणारी आणि आपला  सुंदर तळ स्पष्टपणे दाखवणारी नदी वाहते....तेथे पोहोंचलो...तेथे 
 बोटींग करण्याची आमची हौस पुरी करणार होतो आम्ही!
     बोटीत बसून रपेट करताना नदीच्या तळाचे सौंदर्य उलगडत गेले...गार पाण्याला स्पर्श करत ते ओंजळीत भरून क्षितीजाआड लवकरच जाईल हा ...असे वाटणार्‍या सुर्यनारायणाला नकळतपणे अर्घ्यच दिले म्हणा ना!!
  
      आजच्या दिवसाची सहल एव्हाना शेवटच्या टप्प्यात आली होती....पण उत्सुकता होती ती भारत - बांगलादेश सीमा, त्यावर भारताकडून बांधण्यात आलेले तारेचे काटेरी कुंपण आणि मोठ्ठे गेट बघण्याची....
    अस्ताच्या समीप जाणारा सुर्य, लांबच लांब निर्मनुष्य रस्ता, दोन्ही बाजूंनी रिकामी सोडलेली विस्तीर्ण जागा आणि 'ते' प्रचंड मोठे गेट बघितले आणि आपल्या भारत मातेची सेवा करण्याचे कर्तव्य बजावणाऱ्या सुरक्षा रक्षकांचे (जवानांचे)
मनःपुर्वक आभार मानले....त्यांना "जयहिंद"म्हणत ही सीमा रेषा डोळ्यात भरभरून साठवून घेतली...
     वडिलोपार्जित घराचे दोन सख्ख्या भावांत होणारे पार्टिशन (वाटणी)असावी अशीच ती सीमारेषा होती....लांबच लांब नजरेच्या टप्प्यात न मावणारी....
उदासवाणी...पण भारतीयांचा देशाप्रती स्वाभिमान जागवणारी....
तिला पुनःश्च एकदा नमन करत आम्ही आमच्या मुक्कामी, शिलॉंग येथे परतावयास सुरुवात केली....

    अतीपूर्वेकडील भारतीय राज्ये आत्तापर्यंत बरीचशी 'दुर्लक्षित प्रदेश' याच पठडीत मोडत होती...पण गेल्या काही वर्षांत या भागातील शासनाने पर्यटनाला प्रोत्साहनपर कितीतरी योजना कृतित उतरवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत होता...
त्यातील सर्वात महत्वाचा म्हणजे रस्ते (चांगले)बनवणे, विजपुरवठा आणि हॉटेल व्यवसायाला प्राधान्यक्रम देणे....या त्रयींशिवाय पर्यटनाची मजा नाहीच....या साऱ्यांची पुर्तता निश्चितच पर्यटनाला वाव आणि त्यातून उत्पन्नाचे साधन बनवणे हेच आहे...

    वळणावळणांच्या डोंगरमाथ्यावर राज्य करणारे रस्ते, प्रवास करताना आपण तेथील निसर्गाच्या प्रेमात कधी पाडतो हे समजतही नाही आपल्याला...
     शिलॉंग शहरही तसेच होते...मला येथे हिमाचल मधील शिमला शहराची राहून राहून आठवण येत होती...थोडासा झोंबणारा हवेतील गारवा ,हवाहवासा वाटणारा असाच होता....मेघांची अंबरातून गच्छंती झालेली होती, म्हणून आम्हाला तेथील लहरी निसर्गाचा काहीच त्रास झाला नाही...
मार्च महिन्यातील दोन आठवडे संपलेले होते पण ऊन असे काहीच नव्हते...एप्रिल च्या शेवटास येथे पावसाच्या ॠतूची सुरुवात होते असे समजले....

शिलॉंग--चेरापुंजी...
    
      शिलॉंग मधील चार दिवसांच्या मुक्कामातील आमचा आजचा तिसरा दिवस होता...आजचे आकर्षण होते, "चेरापुंजी" या शहराला आणि परिसराला भेट....
    'चेरापुंजी' म्हटले की मला वाटतं पाचवी सहावीच्या भुगोलाच्या पुस्तकात होता तो उल्लेख आठवला...
 "अख्ख्या जगात 'चेरापुंजी' या शहरात सर्वांत जास्त पाऊस पडतो".....
 कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की आपण या ठिकाणाला प्रत्यक्ष भेट देवू! 

     शिलॉंगहून नाश्ता करुन निघालेली तृप्त रसना आणि प्रसन्न वातावरणाने ताजेतवाने झालेले मन चेरापुंजी कडे धाव घेऊ लागले...दोन तासाचेच अंतर पण घाटाघाटातून जाताना जास्त वाटत होते...सोबतीला हिरव्या हिरव्या पहाडांची आणि मोठ्या झाडाझुडुपांची रस्त्याच्या दुतर्फा गर्दी होतीच...मनसोक्तपणे निसर्ग न्याहाळत आमचा प्रवास चालू होता...

हिमालयिन पहाडांचीही अव्याहत सोबत होती, पण सारेच कसे हिरमुसलेले ओकेओके वाटत होते हे पहाड....चेरापुंजीचे मी मनात रंगवलेले चित्र आणि माझ्या डोळ्यांना दिसणारे चित्र अगदीच विरुद्ध टोकाचे होते...
  माहितीअंती असे समजले की, चेरापुंजीला येण्याचा सिझन खरे म्हणजे हा नाही...तेथील निसर्ग डोळेभरून बघण्यासाठी जून ते ऑक्टोबर मध्ये यायला हवे....
शिवाय गेली बरीच वर्षे चेरापुंजीत सामान्यपणे इतर ठिकाणी होतो तसाही पाऊस पडलेला नाही....आणि आता जगातील सर्वांत जास्त पाऊस पडण्याचे ठिकाण,केंद्र चेरापुंजी ऐवजी बांगला देशाच्या एका गावी(माऊसीनरॅम) सरकले आहे....
     हे ऐकले आणि आमचा तर फारच हिरमोड झाला...कारण तेथील निसर्गात हिरवाईचे प्रमाणही नगण्य होते....खूप दिवसांपासून हा प्रदेश पावसाच्या प्रतीक्षेत असावा हे जाणवत होते...याचा सारा परिणाम तेथील निसर्गावर होणे अगदी स्वाभाविक आहे....
    तेथील एलिफंटा वॉटरफॉल ला पाणीच नाही हे समजले....तेथे जाण्याचा प्रश्नच नव्हता...पण सेव्हन सिस्टर वॉटरफॉल सुध्दा अगदीच नगण्य पाणी फेकतोय हे समजले म्हणून तेही रहित करावे लागले...
पण,भारतातील सर्वात अधिक उंचीवरून (340 मी.) कोसळणारा "नोहकालीकाई" वॉटरफॉल मात्र आम्ही बघावयाचे ठरवले...
      या व्ह्यू पॉईंटवर आलो आणि निसर्गाचे अप्रतीम सौंदर्य मनात, नयनांत साठवून घेतले....
      प्रचंड मोठा गोलाकार आकाराच्या पहाडांचा विशाल द्रोण निसर्गाने बनवलेला दिसत होता...सर्वदूर पर्यंत आपली नजरही पोहोचत नव्हती....पण अगदी लांबून दिसणारा धबधब्याचा ऊंचावरुन पडणारा प्रवाह फारच नजाकतीचा होता....खूप ऊंचावरुन खोल दरीत एका मोठ्या विहिर वजा खड्ड्यात हे फेसाळ पाणी खाली आदळत होते...एवढ्या लांबून पाण्याचा आवाज येणे अशक्य होते ,पण खाली जमा झालेले पाणी मात्र शांत,शितल निळेशार दिसत होते...फारच सुरेख नजारा होता तो!
     नोहालिकाई नावाच्या स्त्री चे नाव या धबधब्याला दिले गेले आहे असे समजले...
     नवऱ्याने संशय घेतलेल्या या नावाच्या सासुरवाशिणीने येथे आपल्या प्राणाची आहूती दिली होती
....ही माहिती मिळताच या धबधब्यावर एक उदास छाया पसरली आहे असे वाटले मात्र...
पण निसर्गाविष्कार अप्रतीमच!!

       यानंतर आम्ही स्वामी रामकृष्णमिश न आश्रमाला भेट दिली...पहाडी प्रदेशात वंचितांसाठी शिक्षणाच्या सोयी सुविधा उपलब्ध करुन, त्यांना व्यावसायिक शिक्षण देत स्वावलंबन शिकवण्याचा वसा या संस्थेने घेतलाय यांनी चेरापुंजीत (सोहरा) येथे फार सकारात्मक कार्याची सुरुवात 1931 पासून सुरु केलेली आहे...ह्या प्रेरणात्मक कामाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटकही या संस्थेला आवर्जुन भेट देतात...मेघालयातील लोकांच्या कलाकुसरीतुन तयार होणाऱ्या कितीतरी वस्तूंचे नमुने येथे बघावयास मिळतात...खरेदीसाठीही एक छान दालन येथे उघलेले आहे...गरम कपड्यांची खरेदी करुन आपणही भरुन पावतो...
      
   एव्हाना दुपारच्या जेवणाची आठवण पोटोबा करवून देत होते..तेथील एका स्थानिक हॉटेल मध्ये आम्ही जेवण घेतले...चवदार होते पण सहलीच्या पहिल्या दिवसापासून बटाटे,बिन्स गाजर यांची सुकी मिक्स भाजी आणि पनीर मसाला आमची पाठ सोडत नव्हते...जेवणात ग्रीन सॅलड,यात हिरव्यागार ईडिलिंबूच्या चकत्यांचा समावेश असायचा....पण रस मात्र अगदीच नसायचा...दातांनी तोडून खाल्लं तर अतिशय आंबट चव...मी शेवटी त्याचा नाद सोडलाच.... सहल संपवून घरी आल्यानंतरच आपल्या जेवणात लिंबू या फळाची जागा किती महत्वाची!याची प्रचिती आली...
याशिवाय जेवणात 
दाळ ,भात दुधीसारख्या किंवा भोपळ्या सारख्या फळाच्या चकत्यांचे गरमागरम पकोडे आणि गोडाचा गुलाबजाम, रसगुल्ला यांपैकी एक असंच असायचं....असो...
      
     चेरापुंजीच्या भेटी दरम्यान झालेला हिरमोड मात्र जवळच असणाऱ्या, असणऱ्या म्हणण्यापेक्षा नैसर्गिकपणे तयार झालेल्या लेण्या बघून कुठच्या कुठे पळाला....उलट पावसाळ्यात आलो असतो या ठिकाणी तर, या दृष्टिला पडल्याच नसत्या कारण बोगद्यात पाणी साचलेले असते....
     पण खरोखर एका पहाडाच्या छताखाली निसर्गात उद्भवलेल्या कांही बदलांमूळे तयार झालेल्या या लेण्या अप्रतीमच!
    या तयार होण्यामागे दोन विचारधारा दिसून येतात....काहींच्या मते, वर्षानुवर्षे जोरदार पाऊसाच्या मार्यामूळे या पहाडाचे अंतर्गत स्वरुप बदलले असावे...तर काहींच्या मते, तेथे हजारो वर्षांपूर्वीच लाव्हारसाचा उद्रेक झाला असावा...त्यामूळे तो थंडावल्या नंतर त्यातून तयार झालेल्या या लेण्या असाव्यात!
    मला तरी दुसर्‍या क्रमांकाची विचारधारा संयुक्तिक वाटते....

    महाराष्ट्रात प्राचीन असतील तरीही विशिष्ट हेतूने जाणीव पूर्वक मानवनिर्मित लेण्या बघण्याची सवय असताना, ह्या लेण्या बघणं मला खूप अप्रुपाईचं वाटलं...थोडसं 'ॲडव्हेंचरस' ही नक्कीच होतं हे काम! पण बघताना चेरापुंजीत आल्याचं सार्थक वाटून;खूप काहीतरी वेगळंच बघितलंयं आपण हे समाधान मिळालं....
    एक मोठी गुहा वाटावी असा बोगदा असावा असं ठिकाण होतं ते! आणि "आत  उतरुन हळू हळू पुढे चालत रहा, पण आपलं डोकं सांभाळत सांभाळतच", असे सांगण्यात आले आम्हाला.....
    बाहेरुन अंदाज घेतला तर आत जाण्यास रस्ता असेल का?उजेड तर नसावाच अशी शंका होती...शिवाय छोट्या,मोठ्या, उभ्या आडव्या लोंबत्या काळ्याशार पाषाणांनी गर्दी करत भरुन गेलेल्या या बोगद्यातून चालावे कसे?आणि बाहेर येता येईल का सुखरुप?अशा नाना शंका मनात पिंगा घालत होत्या..पण
पण नव्हे आपण आत जाऊनच बघू या तर खरे...नाही जमले तर फिरु या परत असा निश्चय केला...
       आतमध्ये शिरल्यानंतर चार पावलंही टाकणं कठिण अशीच गुहा होती ही...खाली-वर, उभे-आडवे कुठेही बघा काही अणीकुचिदार, काही मोठ्ठ्या मोठ्ठ्या आकाराचे पण सारेच काळे कुळकुळीत आणि सिल्की झालेले दगड  ,आत मध्ये व्यवस्था असणाऱ्या दीव्यांच्या प्रकाशात चकाकत होते...लेण्या म्हणण्या पेक्षा वेगवेगळे आकार धारण केलेली,काळ्या पाषाणाची खाणच होती ती!
    प्रवेश एका बाजूने घेतल्यास बाहेर पडण्यासाठी दुसरा मार्ग होता....
या खाचखळग्यांतून आपले डोके सांभाळत, एकमेकांना आधार देत, काही ठिकाणी अक्षरशः सरपटत सरपटत आम्ही हा जवळ जवळ एक कि.अंतराचा बोगदा पार केला....आत मध्ये जाताना डाव्या बाजूला केवळ एक झरोका होता, तेथून काय तो थोडा सुर्यप्रकाश आत येत होता...
    आतून बाहेर पडलो आणि काय आनंद झाला म्हणून सांगू!मला माझ्यावरच विश्वास बसत नव्हता आपण हा पार करुन आलोय यावर!पण एकूण अनुभव आणि ते ठिकाण आम्ही मस्त एन्जॉय केले...आणि चेरापुंजी ची सहल सफल झाली आहे असे जाणवले...
       परतीचा प्रवास सुरू होईपर्यंत सुर्यास्ताची वेळ झाली...
    
   अती पूर्वेकडील या राज्यांमध्ये सुर्योदय लवकर होतो तसाच सुर्यास्त ही आपल्या महाराष्ट्रात होतो त्या पेक्षा खूप अलीकडे होतो...साडेपाचला तीन्हीसांजा झालेली असायची!

       शिलॉंग गुलाबी थंडीचे शहर...निसर्गा बरोबरच मनंही कायम टवटवीत रहात होतं या ठिकाणी...'दमछाक होणं' फार लांब अंतर ठेवून होतं आमच्या पासून! निरनिराळी रंगीबेरंगी फुलं असणारी रोपट्यांची कुंडीतील आकर्षक रचना  स्वागताला असायची सगळीकडेच...प्रसन्न फुलं लगेच आपले लक्ष त्यांच्याकडे वेधून घ्यायचीच...
     
   दुसर्‍या दिवशी सकाळीच आम्ही शिलॉंग शहराचा निरोप घेणार होतो...चार दिवसांत खूप लळा लावला होता या शहराने!
     
   प्रसन्न सकाळ घेऊन उजाडलेली सकाळ आम्हाला पुढच्या प्रवासासाठी खुणावत होती...

शिलॉंग -- तेजपूर....
असा प्रवास होता तो...मेघालयातून आम्ही परत आसामात ब्रह्मपुत्रेच्या किनार्‍यावर जाणार होतो...दोन तासाच्या या प्रवासात आम्ही जाताना मेघालयातील "सुप्रसिद्ध डॉन बॉक्सो म्युझिअम", या अतिशय सुरेख अशा प्रदर्शनाला भेट दिली...चार मजल्यांवर सात मोठी मोठी दालनं असणाऱ्या या प्रदर्शनात अती पूर्वेकडील सातही राज्यांची भौगोलिक दृष्टिकोनातून, सांस्कृतिक, शैक्षणिक, ऐतिहासिक आणि त्यांच्या दैनंदिन जीवनाविषयी, उद्योगधंदे,पोशाखापासून इत्यंभूत माहिती, चित्र रुपाने, कलाकुसरीतून, वस्तूंच्या रुपात, लिखित माहितीच्या रुपात आणि चित्रफितीव्दारे अत्यंत परिपूर्ण आणि महत्वाची माहिती आम्हाला मिळाली. ...
या लोकांची निसर्गाशी असणारी बांधीलकी आणि आदिवासीपण यांचे सचित्र रेखाटन फारच अप्रतिम पध्दतीने सादर केलेले दिसून आले...
 आदिवासी लोकांच्या संदर्भात पीएचडी कणारी मंडळी मुद्दाम अभ्यासासाठी येथे भेटी देतात...
याच वास्तूच्या टेरेसवर स्कायवॉक चा आनंद घेत संपूर्ण शिलॉंग शहराचा अप्रतीम नजारा बघता आला..फारच छान अनुभव होता हा पण ...

    तेजपूर ला जाताना रस्त्यातच नागांव येथे विशाल असे महामृत्यूंजय मंदिर बघितले आम्ही....पर्यटनाला प्रोत्साहनपर आकर्षक ठिकाण म्हणून गेल्या कांही वर्षात नव्यानेच उभारण्यात आलेले हे मंदिर त्या मागचा हेतू साध्य करत आहे...मंदिराचा बाह्य भाग महादेवाच्या पिंडीच्या आकाराचा होता....अजूनही तेथील काम प्रगतीपथावर असल्याचे दिसून आले...
ही वास्तू डोळ्यात साठवून आम्ही आमच्या मुक्कामी पोहोंचलो....

तेजपूर --- दिरांग.

     आसाम मधलं तेजपूर हे ठिकाण, म्हणजे, अरुणाचल प्रदेशात प्रवेश करताना प्रवासाचे ठराविक अंतर पार करत; आराम करण्यासाठी एक सोयीचे ठिकाण... याच दृष्टिकोनातून हा मुक्काम होता आमचा...अर्थातच आल्हाददायक निसर्ग, थंडगार वाहती हवा, आणि सोबतीला पर्वतीय रांगांच्या महिरपी....असे सारे असेल तर माणसाला प्रवासाचा कंटाळा आणि शीण दोन्हीही येत नाही...निसर्गा चे अवलोकन करणं हा छंद असेल जवळच तर अशी भटकंती म्हणजे दुग्धशर्करा योगच!

    तेजपूर ते दिरांग या प्रवासात मात्र आपण आता पहाडांच्या वरच्या भागावर जात आहोत याची जाणीव होऊ लागली...आता पर्यंत च्या प्रवासात लांबून वळसा घालावयास लावणारी वळणं आता मात्र आपला व्यास कमी कमी करत चालली होती...तापमानात घटही कमालीची लक्षात येत होती...
हिमालयाच्या हिमाच्छादित रांगा जवळपासच असाव्यात याचे ज्ञान मनाला आणि वृत्तींनाही जाणवत होते...नव्हे, आता तर हिमाच्छादित शिखरं दृष्टिक्षेपात येऊन अंगावर रोमांच उभे राहू लागले...
    काळ्याशार पहाडांवर शुभ्र बर्फाच्या कणांनी, तुकड्यांनी रेखाटलेली सुंदर रांगोळी म्हणजे त्या अंबराच्या स्वागतार्ह, पाहूणचारासाठी या अवनीने स्वतःच्या हाताने रेखाटलेली सुंदर नक्षीदार रांगोळीच असा भास होत होता....
हा दिवस दिरांग च्या सान्निध्यात घालवला आम्ही...
प्रत्येक हॉटेलच्या परिसरात फुलांचे वैविध्य, त्यांचे रंग आणि रचना मनाला मोहवत असायची...प्रत्येक फूल डोळ्यात आणि फोटोतून जपण्याचा मोह खरोखरच अनावर होत असायचा...

   अरुणाचल प्रदेश हा केंद्रशासित प्रदेश आहे...येथे भारतीय सैन्य दलाच्या परवानगीशिवाय आपण या भुमीवर प्रवेश करु शकत नाही...
ठिकठिकाणी भारतीय सैन्यदलाचे रेजिमेंट्स आपल्याला दिसून येतात...भारतीय जवान पावलापावलावर तळ ठोकून आपल्या भारतीय सीमेचं संरक्षण करत असतानाचे दृश्ये दिसत रहातात...हे बघून आपला उरही अभिमानाने भरून येतो, आणि आपले मन अगदी नकळत त्यांचे आभार मानू लागते...
 आम्ही महाराष्ट्रीयन आहोत म्हटल्यावर,प्रवेशालाच एक सैनिक आमच्याशी मराठीत संवाद साधत होता..'मी लातूरचा आहे' असे त्याने म्हणताच,कृतकृत्य झाल्यासाखे वाटले...बुलढाण्याच्या एका सैनिकानेही मुद्दाम आपली महाराष्ट्रीयन ओळख सांगितली आणि आम्हाला फार आनंद वाटला...त्यालाही आमच्याशी बोलून छान वाटत आहे हे लक्षात आले आमच्या..

  दिरांग वरुन तवांगला जातानाच्या  प्रवासाच्या रस्त्यात आम्ही 500 वर्षे जुनी असणारी मॉन्स्ट्री (भगवान गौतम बुध्दांचा मठ) बघितला...
    किंबहूणा अरुणाचल प्रदेश हा भव्य दिव्य मॉन्स्ट्रीजचा प्रदेश आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही....
  भगवान गौतम बुध्दांचा वास या भुमीला सदैव शांती, प्रेम, आस्था बहाल करतो...एका बाजूला निसर्गाचे विराट रुप, स्वर्गाच्या स्पर्शाला आसुसलेले प्रचंड मोठे हिमाच्छादित शिखरं...आणि दुसरीकडे मॉनस्ट्रीजचे पावित्र्य यांचा सुंदर मिलाफ साधून ताठ मानेने ऊभा असणारा हा प्रदेश...
बौध्द धर्माची विलक्षण छाप जपणारा असाच आहे...
ठिकठिकाणी शांतीचा संदेश देणाऱ्या पताका फडकावत संदेश देत रहातो...
एकापेक्षा एक भव्य दिव्य मॉन्स्ट्रीज, त्यात असणारे,गौतम बुध्दांचे भव्य पुतळे आणि समानतेचा संदेश देणारी त्यातील अनेकविध गोष्टी, वस्तू, तेथील प्रचंड मोठे ध्यान मंदीर आणि मनाला मिळणारी शांतता हे सारंच अद्भुत आहे हे जाणवत रहातं...
  अशा कितीतरी मॉन्स्ट्रीज ना आम्ही भेटी देवून मःशांती अनुभवली या प्रदेशात! प्रत्येक मठातील स्वच्छता, रंगीबेरंगी फुलांच्या ताटव्यांची जोपासना आणि रचना हे सारंच अप्रतिम होतं!

      सेलापास....
    -----------------

तवांगच्याच या रस्त्यामध्ये "सेलापास" नावाचे एक सरोवर आहे...1962 च्या भारत चीन युध्दात सेला नावाच्या मुलीने भारतीयांच्या विजयासाठी फार महत्वाची भुमिका(मदतनीस म्हणून)
बजावली होती...
तिच्या स्मरणार्थ भारत सरकारने बनवलेले हे सरोवर आहे...
   तवांगची ही भुमी हे युध्द चालू असतानाची साक्षिदर आहे...युध्द यशस्वीपणे पेलत, विजयश्री आपल्याकडे खेचून आणली तेच हे 'तवांग' होय....
      सेलापास या सरोवराने तवांगला उर्वरीत भारतभुमीशी जोडून ठेवलेले आहे...म्हणूनही हे सेला पास....
निसर्गाचा अप्रतीम अविष्कार असणारा सेला लेक अक्षरशः आपल्या डोळ्याचे पारणे फेडतो...दुतर्फा शुभ्रतेने नटलेले हिमपर्वत....संपूर्ण पणे गोठून पाणेरी कडक बनलेला चकचकीत पृष्ठभाग म्हणजेच सेला लेक होता..
अगदीच अवर्णनीय होतं हे सारंच...या ठिकाणी ऑक्सिजन चे प्रमाण कमी असते म्हणून बऱ्याच  लोकांना त्रास होऊ शकतो...पण आम्हाला तसे काही जाणवले नाही...याच निसर्गरम्य परिसरात किततरी वेळ रेंगाळत आम्ही आमचे पॅक लंच उघडले आणि मनसोक्त पिकनीक साधून घेतली...

    भारत-चीन युध्दात फारच महत्वाची जबाबदारी पार पाडत शहिद झालेले कॅप्टन जसवंत सिंह यांच्या स्मरणार्थ ऊभे केलेले एक अनुपमेय  मेमोरियल बघण्याचा योगही याच तवांगने घडवून आणला...
"जसवंत घर" असे त्याचे नाव...
प्रत्येक भारतीयाचे स्फुर्तीस्थान असणारे हे ठिकाण... आम्ही विनम्रपणे अभिवादन करत जसवंत सिंहाचे मनोमन आभार मानले...शुध्द हवेवर ऊंच फडकणार्या आपल्या तिरंग्याला आणि जसवंत सिंहांच्या स्मृतिंना जयहिंद करत आम्ही  तेथून निघालो...
   
   महाराष्ट्रभर कडक उन्हाळा असताना आम्ही मात्र थंडीमध्ये कुडकुडत त्या रात्री गरम पांघरुणात लपेटून निद्रादेवीच्या स्वाधीन झालो..

     प्रसन्न सकाळी भरभरुन मोकळा श्वास घेत आम्ही दुसरे दिवशी तवांग शहरात असणाऱ्या जगातील दुसर्‍या क्रमांकाच्या आणि भारतातील पहिल्या क्रमांकाच्या सुंदर मॉन्स्ट्रीला भेट दिली...18 फुट ऊंच असणारा भगवान गौतम बुध्दांचा 
भव्य पुतळा कुठूनही लक्ष वेधून घेत होता...सभोवती असणाऱ्या हिमालयाच्या रांगा आपल्या भोवती फेर धरुन आनंदाने नाचत आहेत असा भास होत होता...या अवनीचे अतीसुंदर रुप आपण जवळून न्याहाळत आहोत ही भावना मनातून कृतज्ञता व्यक्त करत आहे या निसर्गा प्रती... हे समाधान घेऊनच अख्खा दिवस तवांगच्या रम्य सान्निध्यात राहिलो आम्ही.... त्याच सायंकाळी,तवांग वॉर मेमोरियल येथेच नितांत सुंदर असा लाईट अँड साऊंड शो बघितला....
राष्ट्रध्वजाला वंदन करत राष्ट्रगीत गायले आणि तवांग च्या भुमीचे आभार मानत दुसरे दिवशी सकाळी तेथून पुढच्या प्रवासासाठी म्हणजे बोंम्डिला या गावी जाण्याची परवानगी घेतली...

  तवांग --- बोंम्डिला.
-------------------------

   दोन दिवस मस्तपैकी तवांग हे थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण अनुभवले आणि तिसरे दिवशी बोम्डिला या गावी जाण्यास निघालो आम्ही....प्रवास 175 कि.मी.चा, बऱ्या पैकी मोठे अंतर कापायचे होते...कोणताही त्रास होऊ नये आणि कंटाळवाणाही होऊ नये याची भरपूर काळजी घेण्यात येत असे...
मुळात मेघालय आणि अरुणाचल प्रदेशाची सहलीचा हेतूच निसर्गाच्या सान्निध्यात अगदी समरसून रहाणे, अनुभवणे आणि आनंद मिळवणे हा होता....अशा निसर्गात भटकंती कोणाला आवडणार नाही!!...शिवाय रस्ते एकदम छान होते...अगदीच काही ठिकाणी काम चालू असल्याने अगदी थोडी गैरसोय व्हायची पण अगदीच नगण्य अशीच...
     गाड्या आरामदायक होत्या, चालकही चांगले होते आणि नागमोडी चालीने प्रवास करण्यास मज्जा येत होती...
   
      तवांगहून बोम्डिला शहरी जाताना रस्त्यात "गँगॉंग अन् गमपा"
या ठिकाणी अति सुंदर असा "नुरांन्ग"
नावाचा अती उत्कृष्ट निसर्गाविष्कार आम्ही बघितला...हा एक डोळ्याचे पारणे फेडणारा सुंदर धबधबा आहे...
ऊंचावरुन वेगाने खाली पडणारे शुभ्रफेसाळ पाणी, आसमंतात आपले तुषार उडवत आपले वेगळे अस्तित्व सिद्ध करतात...या धबधब्याच्या अगदी पायथ्याशी जाऊन उभे रहाण्यात आणि हा थंडगार शॉवरबाथ घेणं एक अविस्मरणीय अनुभव आहे...
हेच फेसाळलेले पाणी खाली पडून नदीमध्ये एकरुप होऊन आपला प्रवाह शांत करते...नयनसुख काय असतं ते प्रत्यक्षात अनुभवायलाच हवं...
    सेला लेक ज्या प्रमाणे सेला नावाच्या मुलीच्या स्मृती जपण्या साठी तयार झालाय... 
अगदी त्याच कार्यात (युध्दजन्य परिस्थितीत) सैनिकांना मदत केली म्हणून सेलाचीच मैत्रीण,नुरांग् हिची आठवण म्हणून या धबधब्याला "नुरांग्न वॉटरफॉल" असे नाव देण्यात आले आहे...
बराच वेळ रेंगाळत या धबधब्याचा आनंद अनुभवला आणि आम्ही बोम्डीलाच्या दिशेने प्रयाण केले...

    बोम्डिला शहर प्रवेशाच्या अगोदर आणखी एका बौध्द मठाला भेट दिली...
   दिवसभराच्या प्रवासाने आरामाची आवश्यकता आहे ही जाणीव करवून दिली आणि यथेच्छपणे रात्रीचे जेवण घेऊन आम्ही निद्रेच्या स्वधिन झालो...थंडीचा कडाकाही काहीसा कमी झालेला होता....सकाळी पुनः कझिरंगाच्या प्रवासासाठी सिध्द व्हायचे होते आम्हाला...

बोम्डीला--काझीरंगा .
   दुसरा दिवस आमच्या सहलीच्या शेवटचा टप्पा ठरणार होता...बोम्डिला ते काझिरंगा हा सहा तासांचा प्रवास करुन आम्ही आसामच्या काझीरंगा या जुन्या आणि मोठ्या अशा राष्ट्रीय पार्क मध्ये प्रवेश केला....
पार्क असले तरीही एक मोठे शहरच होते हे!फार मोठा परिसर या पार्क च्या रुपाने पालथा घालण्याची संधी मिळाली आम्हाला....
ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर वसलेले हे पार्क एप्रिल च्या शेवटा पर्यंतच पर्यटकांसाठी खुले असते...
  मे पासून आसामात पावसाळा चालू होतो...ब्रह्मपुत्रेच्या पाण्याची पातळी वाढते आणि सारं जंगल तिच्या पाण्याने व्यापून जाते...एप्रिल च्या शेवटी तेथे असणारे प्राणी, पक्षी डोंगराळ भागाकडे कूच करतात...
 काझिरंगा नॅशनल पार्क मध्ये कायम दलदल असण्याचे हेच खरे कारण आहे....
मार्च च्या शेवटीही जंगलामध्ये भरपूर पाण्याचे साठे असल्याचे दिसून आले...
   हे जंगल फारसे दाट नसावे असे वाटते....पण गेंडे आणि हत्ती यांची बरीच वर्दळ असणारे हे ठिकाण आहे...
   आमचे मुख्य आकर्षण होते ते  म्हणजे हत्तीवर स्वार होऊन जंगलात सैर करुन येणे...
      दुसर्‍याच दिवशी भल्या पहाटे आम्ही हत्तीच्या सफारीसाठी जंगलात पोहोचलो...माहूत आपले हत्ती घेऊन तयारच होते...
अंबारीवजा बेंचेस ची व्यवस्था स्वार होण्यासाठी हत्तीच्या पाठीवर होती...बसे पर्यंत थोडी भिती वाटली...पण मग मात्र निश्चिंतपणे मुक्त सैर केली जंगलात...या एक दीड तासाच्या सफारीवर असताना आम्हाला बरेचसे गेंडे, हत्तीचे कळप, हरीण, सुसर असे प्राणी दिसले...
रानरेडे, आणि काही पक्षी एवढीच काय ती संपत्ती दिसली जंगलाची,पण आमची नजर वाघोबाचा वेध घेत होती...पण शेवटी भ्रमनिरासच झाला..हा अनुभव मात्र मजा चाखून गेला आम्हाला...
     दुपारच्या सत्रात जीप सफारी केली...तेंव्हा तरी दिसेल काही असे वाटले, पण छे!एखाद दुसर्‍या गेंड्या शिवाय काहीही दिसले नाही...

      याच परिसरात असणाऱ्या ऑर्चिड पार्क मध्ये मात्र फार उपयुक्त माहिती मिळाली आणि एकाहून एक सुंदर सुंदर ऑर्चिड्सचे रंग, गंध आणि प्रकार अगदी जवळून बघितले...एवढी सारी फुले बघून मन हर्षोल्हासित झाले आणि काझीरंगाला भेट देण्याचे सार्थक वाटले....
  या शिवाय कॅक्टस गार्डन मध्ये कॅक्टस च्या कधीही न बघितलेल्या कितीतरी जाती बघावयास मिळाल्या...अक्षरशः आचंबित व्हायला झाले....
    याशिवाय थोडीफार खरेदीही झालीच... आसामच्या बिहू नृत्याची आणि त्या मागील हेतू विषयी माहिती देत ह्या पारंपारिक नृत्याचे सादरीकरण खास आम्हा पर्यटकांसाठी हॉटल मध्ये आयोजित करण्यात आले होते...या सर्वांचा आनंद घेत आमचा मुक्काम आम्ही काझीरंगा परिसरात केला....निसर्गाशी हितगुज मनाला आनंद दायक वाटले...पण रात्री आणि सकाळी पाऊसाने मस्त जोरदार हजेरी लावत सलामी दिली आम्हाला....पण तारांबळ उडवली नाही मात्र....

काझीरंगा--गोवहाटी 
-------------------------

सकाळी पावसातच काझीरंगाचा निरोप घेऊन आम्ही गोवहाटीसाठी प्रवास चालू केला....
 प्रवेशालाच ब्रह्मपुत्रेच्या पाण्यात  एका बेटावर असणाऱ्या
 "उमानंदा " या अती प्राचीन महादेव  मंदिराला भेट देवून त्या शिवशंभो ला नमस्कार घातला...
जाता येता छोटासा बोटीचा प्रवास करुन घेतलेले दर्शन, व्दारकेच्या बेट व्दारकेची आठवण देऊन गेला....
खरं म्हणजे या रात्री आमचे ब्रह्मपुत्रेच्या पाण्यावर क्रुझ डिनर ठरलेले होते....पण नेमके याच दिवशी आसामचे मुख्यमंत्री शहरात येणार होते आणि याच क्रुझवर त्यांच्या डिनरचे आयोजन केलेले होते....सहाजिकच आम्हाला माघार घ्यावी लागली...
आम्ही आपले छानपैकी हॉटेल डिनर एन्जॉय केले आणि सकाळी परतीचे वेध घेत निद्राधिन झालो...

   हा आमचा सहलीच्या निरोपाचा दिवस होता...शुचिर्भूत होऊन नाश्ता आटोपला आणि गोवहाटीत असणाऱ्यां कामाख्य देवीच्या दर्शनासाठो सज्ज झालो....
साडेतीन पीठापैकी एक असणारं हे एक जागृत शक्तीपीठ आहे...मंदीरात गर्दी बरीच होती...अगदी गावातच असणारं पुरातन मंदिर,कोणतेही मंदिर असू द्यात, तेथील चित्र नेहमीच जसं असतं तसंच सारं सारं होतं येथेही....
मुखदर्शन घेऊन आम्ही देवीला मनोमन नमस्कार केला आणि सहलीची सांगता केली....
दुपारी दोन वाजेपर्यंत एअरपोर्ट गाठावे लागणार होते....तत्पुर्वि सर्वांनी एकत्रित जेवणाचा अस्वाद घेत परस्परांचा निरोप घेतला आणि आपापल्या मार्गावरच्या विमानात स्वार होऊन परतीचा प्रवास चालू केला...
आमचे विमान सर्वांत शेवटी रात्री दहा वाजता होते...
एअरपोर्ट वर बराच वेळ गर्दी ला न्याहाळत अवलोकन केले....
छोटेसेच होते एअरपोर्ट पण संपूर्ण देशाच्या प्रमुख शहरांशी जोडला गेलेले होते हे शहर!त्या मूळे गर्दी भरपूरच होती आणि विमानांची ये जा सुध्दा खूप मोठ्या प्रमाणावर होती येथे...
     ठरलेल्या वेळी आमच्या विमानाने टेक ऑफ केले आणि सहलीला जाताना पौर्णिमेचा पूर्ण चंद्र सोबत घेऊन गेलेलो आम्ही,सहलीहून येताना मात्र काळ्याभोर आभाळात आकाशगंगा आणि कितीतरी लखलखतं चांदणं सोबत घेऊन चाललो होतो....
    फाल्गुनाच्या परतीचा काळ होता तो...चांदोबा मात्र गडप होऊन गेले होते या काळ्या आभाळाच्या पोटात....पुन्हा नव्याने, नव्या रुपात लवकरच प्रकटण्यासाठी.....
आम्हीही अडीच तासाचा विमान प्रवास आणि त्या नंतर पाच तासांचे मार्गक्रमण करत सुर्योदयाच्या साक्षीने आमच्या घरी परतलो....
जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्ही सहलीला, पण आपल्या घराची ओढ मात्र कायम आपली सोबत करत असते आणि आल्या नंतर "आपले घर ते आपलेच घर....त्याची सर नाहीच कशालाच.."
हा विचार येतोच येतो.....

समाप्त....
दि. 23-4-2022.


🌹🌹🌹🌹🌹

सोमवार, १८ एप्रिल, २०२२

आमची नॉर्थईस्ट सहल...

आमची नॉर्थईस्ट,
थ्री सिस्टर्स सहल....
-------------------------
लेखिका---
©️ 
नंदिनी म. देशपांडे. 

.....क्रमशः पुढे चालू...

     अतीपूर्वेकडील भारतीय राज्ये आत्तापर्यंत बरीचशी 'दुर्लक्षित प्रदेश' याच पठडीत मोडत होती...पण गेल्या काही वर्षांत या भागातील शासनाने पर्यटनाला प्रोत्साहनपर कितीतरी योजना कृतित उतरवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत होता...
त्यातील सर्वात महत्वाचा म्हणजे रस्ते (चांगले)बनवणे, विजपुरवठा आणि हॉटेल व्यवसायाला प्राधान्यक्रम देणे....या त्रयींशिवाय पर्यटनाची मजा नाहीच....या साऱ्यांची पुर्तता निश्चितच पर्यटनाला वाव आणि त्यातून उत्पन्नाचे साधन बनवणे हेच आहे...

      वळणावळणांच्या डोंगरमाथ्यावर राज्य करणारे रस्ते, प्रवास करताना आपण तेथील निसर्गाच्या प्रेमात कधी पाडतो हे समजतही नाही आपल्याला...
     शिलॉंग शहरही तसेच होते...मला येथे हिमाचल मधील शिमला शहराची राहून राहून आठवण येत होती...थोडासा झोंबणारा हवेतील गारवा ,हवाहवासा वाटणारा असाच होता....मेघांची अंबरातून गच्छंती झालेली होती, म्हणून आम्हाला तेथील लहरी निसर्गाचा काहीच त्रास झाला नाही...
मार्च महिन्यातील दोन आठवडे संपलेले होते पण ऊन असे काहीच नव्हते...एप्रिल च्या शेवटास येथे पावसाच्या ॠतूची सुरुवात होते असे समजले....

शिलॉंग--चेरापुंजी...
    
      शिलॉंग मधील चार दिवसांच्या मुक्कामातील आमचा आजचा तिसरा दिवस होता...आजचे आकर्षण होते, "चेरापुंजी" या शहराला आणि परिसराला भेट....
    'चेरापुंजी' म्हटले की मला वाटतं पाचवी सहावीच्या भुगोलाच्या पुस्तकात होता तो उल्लेख आठवला...
 "अख्ख्या जगात 'चेरापुंजी' या शहरात सर्वांत जास्त पाऊस पडतो".....
 कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की आपण या ठिकाणाला प्रत्यक्ष भेट देवू! 

     शिलॉंगहून नाश्ता करुन निघालेली तृप्त रसना आणि प्रसन्न वातावरणाने ताजेतवाने झालेले मन चेरापुंजी कडे धाव घेऊ लागले...दोन तासाचेच अंतर पण घाटाघाटातून जाताना जास्त वाटत होते...सोबतीला हिरव्या हिरव्या पहाडांची आणि मोठ्या झाडाझुडुपांची रस्त्याच्या दुतर्फा गर्दी होतीच...मनसोक्तपणे निसर्ग न्याहाळत आमचा प्रवास चालू होता...

हिमालयिन पहाडांचीही अव्याहत सोबत होती, पण सारेच कसे हिरमुसलेले ओकेओके वाटत होते हे पहाड....चेरापुंजीचे मी मनात रंगवलेले चित्र आणि माझ्या डोळ्यांना दिसणारे चित्र अगदीच विरुद्ध टोकाचे होते...
  माहितीअंती असे समजले की, चेरापुंजीला येण्याचा सिझन खरे म्हणजे हा नाही...तेथील निसर्ग डोळेभरून बघण्यासाठी जून ते ऑक्टोबर मध्ये यायला हवे....
शिवाय गेली बरीच वर्षे चेरापुंजीत सामान्यपणे इतर ठिकाणी होतो तसाही पाऊस पडलेला नाही....आणि आता जगातील सर्वांत जास्त पाऊस पडण्याचे ठिकाण,केंद्र चेरापुंजी ऐवजी बांगला देशाच्या एका गावी(माऊसीनरॅम) सरकले आहे....
     हे ऐकले आणि आमचा तर फारच हिरमोड झाला...कारण तेथील निसर्गात हिरवाईचे प्रमाणही नगण्य होते....खूप दिवसांपासून हा प्रदेश पावसाच्या प्रतीक्षेत असावा हे जाणवत होते...याचा सारा परिणाम तेथील निसर्गावर होणे अगदी स्वाभाविक आहे....
    तेथील एलिफंटा वॉटरफॉल ला पाणीच नाही हे समजले....तेथे जाण्याचा प्रश्नच नव्हता...पण सेव्हन सिस्टर वॉटरफॉल सुध्दा अगदीच नगण्य पाणी फेकतोय हे समजले म्हणून तेही रहित करावे लागले...
पण,भारतातील सर्वात अधिक उंचीवरून (340 मी.) कोसळणारा "नोहकालीकाई" वॉटरफॉल मात्र आम्ही बघावयाचे ठरवले...
      या व्ह्यू पॉईंटवर आलो आणि निसर्गाचे अप्रतीम सौंदर्य मनात, नयनांत साठवून घेतले....
      प्रचंड मोठा गोलाकार आकाराच्या पहाडांचा विशाल द्रोण निसर्गाने बनवलेला दिसत होता...सर्वदूर पर्यंत आपली नजरही पोहोचत नव्हती....पण अगदी लांबून दिसणारा धबधब्याचा ऊंचावरुन पडणारा प्रवाह फारच नजाकतीचा होता....खूप ऊंचावरुन खोल दरीत एका मोठ्या विहिर वजा खड्ड्यात हे फेसाळ पाणी खाली आदळत होते...एवढ्या लांबून पाण्याचा आवाज येणे अशक्य होते ,पण खाली जमा झालेले पाणी मात्र शांत,शितल निळेशार दिसत होते...फारच सुरेख नजारा होता तो!
     नोहालिकाई नावाच्या स्त्री चे नाव या धबधब्याला दिले गेले आहे असे समजले...
     नवऱ्याने संशय घेतलेल्या या नावाच्या सासुरवाशिणीने येथे आपल्या प्राणाची आहूती दिली होती
....ही माहिती मिळताच या धबधब्यावर एक उदास छाया पसरली आहे असे वाटले मात्र...
पण निसर्गाविष्कार अप्रतीमच!!

       यानंतर आम्ही स्वामी रामकृष्णमिश न आश्रमाला भेट दिली...पहाडी प्रदेशात वंचितांसाठी शिक्षणाच्या सोयी सुविधा उपलब्ध करुन, त्यांना व्यावसायिक शिक्षण देत स्वावलंबन शिकवण्याचा वसा या संस्थेने घेतलाय यांनी चेरापुंजीत (सोहरा) येथे फार सकारात्मक कार्याची सुरुवात 1931 पासून सुरु केलेली आहे...ह्या प्रेरणात्मक कामाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटकही या संस्थेला आवर्जुन भेट देतात...मेघालयातील लोकांच्या कलाकुसरीतुन तयार होणाऱ्या कितीतरी वस्तूंचे नमुने येथे बघावयास मिळतात...खरेदीसाठीही एक छान दालन येथे उघलेले आहे...गरम कपड्यांची खरेदी करुन आपणही भरुन पावतो...
      
   एव्हाना दुपारच्या जेवणाची आठवण पोटोबा करवून देत होते..तेथील एका स्थानिक हॉटेल मध्ये आम्ही जेवण घेतले...चवदार होते पण सहलीच्या पहिल्या दिवसापासून बटाटे,बिन्स गाजर यांची सुकी मिक्स भाजी आणि पनीर मसाला आमची पाठ सोडत नव्हते...जेवणात ग्रीन सॅलड,यात हिरव्यागार ईडिलिंबूच्या चकत्यांचा समावेश असायचा....पण रस मात्र अगदीच नसायचा...दातांनी तोडून खाल्लं तर अतिशय आंबट चव...मी शेवटी त्याचा नाद सोडलाच.... सहल संपवून घरी आल्यानंतरच आपल्या जेवणात लिंबू या फळाची जागा किती महत्वाची!याची प्रचिती आली...
याशिवाय जेवणात 
दाळ ,भात दुधीसारख्या किंवा भोपळ्या सारख्या फळाच्या चकत्यांचे गरमागरम पकोडे आणि गोडाचा गुलाबजाम, रसगुल्ला यांपैकी एक असंच असायचं....असो...
      
     चेरापुंजीच्या भेटी दरम्यान झालेला हिरमोड मात्र जवळच असणाऱ्या, असणऱ्या म्हणण्यापेक्षा नैसर्गिकपणे तयार झालेल्या लेण्या बघून कुठच्या कुठे पळाला....उलट पावसाळ्यात आलो असतो या ठिकाणी तर, या दृष्टिला पडल्याच नसत्या कारण बोगद्यात पाणी साचलेले असते....
     पण खरोखर एका पहाडाच्या छताखाली निसर्गात उद्भवलेल्या कांही बदलांमूळे तयार झालेल्या या लेण्या अप्रतीमच!
    या तयार होण्यामागे दोन विचारधारा दिसून येतात....काहींच्या मते, वर्षानुवर्षे जोरदार पाऊसाच्या मार्यामूळे या पहाडाचे अंतर्गत स्वरुप बदलले असावे...तर काहींच्या मते, तेथे हजारो वर्षांपूर्वीच लाव्हारसाचा उद्रेक झाला असावा...त्यामूळे तो थंडावल्या नंतर त्यातून तयार झालेल्या या लेण्या असाव्यात!
    मला तरी दुसर्‍या क्रमांकाची विचारधारा संयुक्तिक वाटते....

    महाराष्ट्रात प्राचीन असतील तरीही विशिष्ट हेतूने जाणीव पूर्वक मानवनिर्मित लेण्या बघण्याची सवय असताना, ह्या लेण्या बघणं मला खूप अप्रुपाईचं वाटलं...थोडसं 'ॲडव्हेंचरस' ही नक्कीच होतं हे काम! पण बघताना चेरापुंजीत आल्याचं सार्थक वाटून;खूप काहीतरी वेगळंच बघितलंयं आपण हे समाधान मिळालं....
    एक मोठी गुहा वाटावी असा बोगदा असावा असं ठिकाण होतं ते! आणि "आत  उतरुन हळू हळू पुढे चालत रहा, पण आपलं डोकं सांभाळत सांभाळतच", असे सांगण्यात आले आम्हाला.....
    बाहेरुन अंदाज घेतला तर आत जाण्यास रस्ता असेल का?उजेड तर नसावाच अशी शंका होती...शिवाय छोट्या,मोठ्या, उभ्या आडव्या लोंबत्या काळ्याशार पाषाणांनी गर्दी करत भरुन गेलेल्या या बोगद्यातून चालावे कसे?आणि बाहेर येता येईल का सुखरुप?अशा नाना शंका मनात पिंगा घालत होत्या..पण
पण नव्हे आपण आत जाऊनच बघू या तर खरे...नाही जमले तर फिरु या परत असा निश्चय केला...
       आतमध्ये शिरल्यानंतर चार पावलंही टाकणं कठिण अशीच गुहा होती ही...खाली-वर, उभे-आडवे कुठेही बघा काही अणीकुचिदार, काही मोठ्ठ्या मोठ्ठ्या आकाराचे पण सारेच काळे कुळकुळीत आणि सिल्की झालेले दगड  ,आत मध्ये व्यवस्था असणाऱ्या दीव्यांच्या प्रकाशात चकाकत होते...लेण्या म्हणण्या पेक्षा वेगवेगळे आकार धारण केलेली,काळ्या पाषाणाची खाणच होती ती!
    प्रवेश एका बाजूने घेतल्यास बाहेर पडण्यासाठी दुसरा मार्ग होता....
या खाचखळग्यांतून आपले डोके सांभाळत, एकमेकांना आधार देत, काही ठिकाणी अक्षरशः सरपटत सरपटत आम्ही हा जवळ जवळ एक कि.अंतराचा बोगदा पार केला....आत मध्ये जाताना डाव्या बाजूला केवळ एक झरोका होता, तेथून काय तो थोडा सुर्यप्रकाश आत येत होता...
    आतून बाहेर पडलो आणि काय आनंद झाला म्हणून सांगू!मला माझ्यावरच विश्वास बसत नव्हता आपण हा पार करुन आलोय यावर!पण एकूण अनुभव आणि ते ठिकाण आम्ही मस्त एन्जॉय केले...आणि चेरापुंजी ची सहल सफल झाली आहे असे जाणवले...
       परतीचा प्रवास सुरू होईपर्यंत सुर्यास्ताची वेळ झाली...
    
   अती पूर्वेकडील या राज्यांमध्ये सुर्योदय लवकर होतो तसाच सुर्यास्त ही आपल्या महाराष्ट्रात होतो त्या पेक्षा खूप अलीकडे होतो...साडेपाचला तीन्हीसांजा झालेली असायची!

       शिलॉंग गुलाबी थंडीचे शहर...निसर्गा बरोबरच मनंही कायम टवटवीत रहात होतं या ठिकाणी...'दमछाक होणं' फार लांब अंतर ठेवून होतं आमच्या पासून! निरनिराळी रंगीबेरंगी फुलं असणारी रोपट्यांची कुंडीतील आकर्षक रचना  स्वागताला असायची सगळीकडेच...प्रसन्न फुलं लगेच आपले लक्ष त्यांच्याकडे वेधून घ्यायचीच...
     
   दुसर्‍या दिवशी सकाळीच आम्ही शिलॉंग शहराचा निरोप घेणार होतो...चार दिवसांत खूप लळा लावला होता या शहराने!
     
   प्रसन्न सकाळ घेऊन उजाडलेली सकाळ आम्हाला पुढच्या प्रवासासाठी खुणावत होती...

शिलॉंग -- तेजपूर....
असा प्रवास होता तो...मेघालयातून आम्ही परत आसामात ब्रह्मपुत्रेच्या किनार्‍यावर जाणार होतो...दोन तासाच्या या प्रवासात आम्ही जाताना मेघालयातील "सुप्रसिद्ध डॉन बॉक्सो म्युझिअम", या अतिशय सुरेख अशा प्रदर्शनाला भेट दिली...चार मजल्यांवर सात मोठी मोठी दालनं असणाऱ्या या प्रदर्शनात अती पूर्वेकडील सातही राज्यांची भौगोलिक दृष्टिकोनातून, सांस्कृतिक, शैक्षणिक, ऐतिहासिक आणि त्यांच्या दैनंदिन जीवनाविषयी, उद्योगधंदे,पोशाखापासून इत्यंभूत माहिती, चित्र रुपाने, कलाकुसरीतून, वस्तूंच्या रुपात, लिखित माहितीच्या रुपात आणि चित्रफितीव्दारे अत्यंत परिपूर्ण आणि महत्वाची माहिती आम्हाला मिळाली. ...
या लोकांची निसर्गाशी असणारी बांधीलकी आणि आदिवासीपण यांचे सचित्र रेखाटन फारच अप्रतिम पध्दतीने सादर केलेले दिसून आले...
 आदिवासी लोकांच्या संदर्भात पीएचडी कणारी मंडळी मुद्दाम अभ्यासासाठी येथे भेटी देतात...
याच वास्तूच्या टेरेसवर स्कायवॉक चा आनंद घेत संपूर्ण शिलॉंग शहराचा अप्रतीम नजारा बघता आला..फारच छान अनुभव होता हा पण ...

    तेजपूर ला जाताना रस्त्यातच विशाल असे महामृत्यूंजय मंदिर बघितले आम्ही....पर्यटनाला प्रोत्साहनपर आकर्षक ठिकाण म्हणून गेल्या कांही वर्षात नव्यानेच उभारण्यात आलेले हे मंदिर त्या मागचा हेतू साध्य करत आहे...मंदिराचा बाह्य भाग महादेवाच्या पिंडीच्या आकाराचा होता....अजूनही तेथील काम प्रगतीपथावर असल्याचे दिसून आले...
ही वास्तू डोळ्यात साठवून आम्ही आमच्या मुक्कामी पोहोंचलो....

     भाग दुसरा 👆
क्रमशः

🌹🌹🌹🌹🌹

मंगळवार, १२ एप्रिल, २०२२

आमची नॉर्थईस्ट, थ्री सिस्टर्स सहल..

🎍आमची नॉर्थईस्ट, थ्री. 
             सिस्टर्स सहल 🎍

©️लेखिका---
नंदिनी म. देशपांडे. 

पुणे ते गोहाटी प्रयाण....
-------------------------
 पुण्याच्या विमानतळावरुन रात्री अडीच वाजता निघालेलं आमचं फ्लाईट अडीच तासात,म्हणजे सकाळी साडेपाच वाजता गोहाटीत पोहोंचले...गम्मत म्हणजे,सकाळी पावणेपाच वाजताच आकाशात तांबडं फुटलेलं होतं...
अरे बापरे!आता तर चक्क उजाडलंयं की...रात्रभर न झालेली झोप आता कशी भरुन काढणार?अशक्यच होतं...
वाहन कोणतंही असो, प्रवासात झोप न येणं किंवा आलीच ती,तर तिला पिटाळून लावणं हे मला कसं काय जमतं हे कोडं आणखी मलाच सुटलेलं नाही...
नवीन ठिकाणी जाण्याची उत्सुकता, भवताल निरखण्याची  क्षमता आणि सोबतच चालू असणारं विचारांचं चक्र या गोष्टी कारणीभूत असाव्यात यासाठी असं वाटतं...
     आता रात्रीच्या वेळेस मिट्ट काळोखात काय डोंबल दिसणार भोवतीचे?असा प्रश्न बाकीच्यांना पडणं अगदी स्वाभाविक आहेच...पण मला त्या मिट्ट काळोखात सुध्दा खूप काही दिसत होतं...सुरुवातीला उड्डाण घेईपर्यंत विमानतळावर रेखाटलेली रंगीबेरंगी दिव्यांची शिस्तीत काढलेली रांगोळी, वैमानिकाचे विमानाची दिशा बदलत नेण्याचे कसब,सवयीनं लक्षात येणाऱ्या आवाजावरुन आता विमान उड्डाण घेईल असे सांगणारे क्षण आणि एकदा उड्डाण घेतल्यानंतर शहरभर पसरलेलं लाईटच्या दिव्यांची निरनिराळी लहान होत बारीक बारीक होणारी मोहक आरास!काय सुंदर दिसतं हे दृश्य!
आपण अधांतरीच आहोत आता ही मनाला झालेली जाणीव थोडी कावरी बावरी करते आपल्याला, पण सुंदर,हसतमुख आणि गोडगोड बोलणार्‍या हवाईसुंदरींची शिस्तीत चाललेली लगबग लगेच आपले लक्ष वेधून घेतेच...
  तर,आसाम,मेघालय आणि अरुणाचल प्रदेश अशी आखणी होती आमच्या टूरची...
       
      गोहाटीतून  सुरु झालेल्या प्रवासाच्या चकचकीत रस्त्यांवर दुतर्फा उंचच उंच आणि सरळसोट वाढत चालेल्या उत्तम प्रतिच्या बांबूची झुडपं गर्दी करत बांबूचं जंगल बनवत आहेत हे लगेच लक्षात येत होतं...हिरवेगार अगदी सरळसोट बांबू आणि त्याची अणिकुचिदार पानं मनाला भुरळ घालत होती...त्यावर डोलणारी पिसासारखी तुरे म्हणजे आपल्याला घर स्वच्छतेसाठी झाडू बनून मदत करणारी केरसुणी हे लगेच लक्षात आले माझ्या...
आसामातील
    बांबू भारतात सर्वदूर पर्यंत आणि परदेशातही निर्यात होतात अशी त्यांची ख्याती आहे....
ठिकठिकाणी बांबूपासून बनवलेल्या सुंदर अशा आकर्षक वस्तू मनाला मोहित करत रहातात...बांबूपासून बनवण्यात येणाऱ्या वस्तूंमूळे आसाम राज्यातील लोकांना  मोठ्या प्रमाणावर कुटिरुद्योगाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत हे मात्र खरे...

🌹🌹

   गोहाटी ते शिलॉंग 
-------------------------
    दुपारच्या जेवणानंतर गोहाटीत पाणी पिल्यानंतर आपण खूप मोठ्या अशा एक महत्वाच्या,म्हणजे 'ब्रह्मपुत्रा' नामक सरितेचं पाणी प्यालो आहोत,ही जाणीव  समाधान देऊन गेली...शहरातून प्रवास करत करत आम्हाला मेघालय ची राजधानी शिलॉंग गाठायचे होते...चार तासांचेच अंतर एका राज्यातून दुसर्‍या राज्यात प्रवेश करण्यासाठी!
    खेळीमेळीत प्रवास चालू असताना आल्हाददायक अशा पर्वतीय पहाडांची प्रवासात साथ चालू झाली,आणि लगेच आपण मेघालयात प्रवेश केलाय याची ग्वाही मिळाली....
वातावरणात होणारा बदल लक्षात येऊ लागला होता...

एव्हाना बांबूच्या झुडूपांची संगत कमी कमी होत होती...पहाडांवर इतरही अनेक प्रकारची हिरवीगार झाडं गुण्यागोविंदाने डोलत होती...
     शिलॉंग,मेघालयाच्या राजधानीचं शहर....
येथे प्रवेश करण्यापूर्वी रस्त्यातच आम्ही कृत्रिम पध्दतीने बनवलेल्या सर्वात मोठ्या अशा "उमिअम"लेक, मध्ये जो डोंगरांच्या कुशीमध्ये विजनिर्मिती साठी बनवला गेलाय...तर या तलावात नजिकच आलेल्या सुर्यास्ताच्या साक्षीनं  शांत वातावरणात मस्तपैकी बोटिंग करत झुळूझुळू पाण्यावर हळूवार तरंगत आनंद घेतला...सोनेरी उन्हाची पाण्यावर शिंपण करत,अस्ताला जाणारा दिनकर डोळ्यात साठवून घेतला...
रात्रीच्या जेवणानंतर  आदल्या रात्री न झालेल्या झोपेने आम्हाला तिच्या अधिन करवून घेतले...

'मेघालय' मेघांचं ढगांचं भांडार असणारा प्रदेश, भारताच्या अती पूर्वेकडील राज्यांपैकी एक....कित्तेक वर्षे या राज्यांमध्ये पर्यटनाला येण्याची हिम्मत कोणी करत नव्हते...भौगोलिक दृष्टिने लहरी, बऱ्याच लांब आणि अधुनिक सुविधांशी फारशी हातमिळवणी न केलेल्या या प्रदेशात यावयास कोणी धजावत नसावे बहूतेक....
   हिमालयिन डोंगरांच्या रांगांमध्ये वसलेला आणि काळ्याशार मेघांचे पांघरुण लपेटून राहाणारा हा प्रदेश...येथील माणसं अतिशय साधी, सोज्वळ सभ्य असावेत असेच जाणवले...
सुपारीच्या उंचच उंच झाडांनी वेढलेला हा प्रदेश भरभरुन नयनसुख देणारा असाच...पाऊसाला केंव्हाही झेलणारा आणि पाऊस पडला की थंडीशीही गट्टी करणारा असा....
प्रवास चालू असताना, मेघालयात, लग्न जुळवण्यासाठी मुलाकडची मंडळी मुलीसाठी सांगून येते, किंबहूणा मुला कडचे मुलीकडच्यांना हुंडा देतात आणि मुलगा मुलीच्या घरी जाऊन घरजावई बनून रहातो...छोटा मोठा व्यवसाय करतो असे समजले...मुलगी मात्र या घरची कर्ती स्त्री  असते...हे ऐकून आश्चर्य वाटलं!

    मनसोक्तपणे आपल्याच नादात वाकडी तिकडी वाढलेली हिरवीगार झाडं वेली, मोठमोठी  वृक्ष आपल्या अंगाखांद्यावर खेळवणारी भुमी, मेघालया च्या रुपानं पृथ्वीतलावर अवतरली आहे असे म्हणता येईल...

    मेघालयाच्या मातीची पायधूळ आपण अनुभवली की, निसर्गाच्या तांत्रिक रुपाची प्रचिती येते...
"माणसानं यशाची कितीही शिखरं काबिज केलेली असो पण त्याने आपले पाय मात्र  आपल्या मातीतच घट्ट रोवून ठेवावेत", अशी एक म्हण आहे मराठीत...
मेघालयातील मोठमोठी पण अस्ताव्यस्त पसरलेली,वनराजी बघून ही म्हण तेथील वृक्षांनी शब्दशः आमलात आणली आहे असे म्हणता येईल...

"लाईव्हरुट्स ब्रिजेस" हा शब्द आपल्या कानावरुनही गेला नाही कधी...पण या राज्यात घनदाट वनराजींमध्ये माणसांसाठी सोय म्हणून की काय, निसर्गातूनच असे वर्षानूवर्षांपासून जीवीत असणाऱ्या झाडांनी,वृक्षांनी आपली मुळं पसरवत,नैसर्गिक पुलांची केलेली बांधणी दिसून येते.....कितीतरी संख्येनं तयार होत, आजही ती जीवीत अवस्थेतच वापरली जातात...
   निसर्गाने मानवाला दिलेला हा अनमोल ठेवा तेथील शासनानेही जसा आहे तसा जपलाय...
काही दुमजली पुल आहेत तर बाकीची एकेरी, पण आपण त्यावरुन चालत जाताना खरोखरच थक्क व्हायला होते...
आमचं दुसर्‍याच दिवशीचं आकर्षण हे होतं आणि तो बघण्याची उत्सुकता ताणलेली होती...

ठरल्या प्रमाणे सकाळच्या उत्साहवर्धक मनानं, निसर्गाच्या कुशीतून फेरफटका मारण्यासाठी आम्ही दाट जंगलामध्ये प्रवेश केला...नैसर्गिक स्वरुपात पाऊलवाटेने तयार झालेल्या ओबडधोबड रस्त्यावरुन खरं म्हणजे माणसालाच हल्ली सवय राहिली नाहीए अशा रस्त्यांची...
पण, पण येथे मात्र, "अरे आम्ही या जंगलाचे राजे,येथे आमचेच राज्य असणार ना?"असा प्रतिप्रश्न करत डौलाने आपल्या पानांची सळसळ वाजवत आमच्यावर दाट सावली धरणारी, मोठी मोठी उंच वाढत गेलेली झाडंच आम्हाला चालताना तोल सावरायला आधार देत होती...
समुहाने आलो होतो याठिकाणी म्हणून बरे झाले, पण एकट्या दुकट्याला हिंमत नसती झाली ईकडे येण्याची!असे वाटून गेले क्षणभर!
आणि चालत असतानाच जाणवले, अरे खाली खोल ओढा असावा...थोड्याफार साठलेल्या पाण्याच्या खूणा दिसल्या तेथे... पावसाळ्यात पाण्याच्या माऱ्याने निरनिराळे आकार धारण करत, पहुडलेल्या काळ्या कुळकुळीत दगडांमधून कसरत करत उतरायचे होते आम्हाला...हा विचार मनात घोळत असतानाच आम्ही दोन्ही बाजूंनी झुकत परस्परांत मिसळून घनदाट सावली धरणाऱ्या एका पुलावरतून चालत आहोत आपण आणि हाच तोच झाडांनी (निसर्गाने) माणसाच्या सोयीसाठी बांधलेला पूल आहे हे लक्षात आले...
 या निसर्गासमोर अक्षरशः नतमस्तक व्हायला झाले...

    निसर्गाची ही किमया डोळ्यात साठवून ठेवताना मोबाईल मध्ये साठवण्याचा मोह अजिबात आवरता आला नाही...
      निसर्गाशी अतिशय जवळीक साधणाऱ्या या राज्यात, मेघालयात "मॉलिंनॉंग" नावाच्या एका छोट्याशा खेड्याला भेट दिली आम्ही.....
या मॉलिंनॉंग चे महत्व यासाठी की, हे एशियातील सर्वांत जास्त स्वच्छता राखलेले खेडे म्हणून प्रसिद्धीस आलेले आहे...आणि ते तसेच होतेही...निसर्गाच्या याच सान्निध्यात घरगुती पध्दतीने बनवलेले दुपारचे जेवण घेऊन आमची रसना तृप्त झाली...
       तेथेच थोडी भटकंती करत शतपावली साधली...

 या नंतर मग "डावकी"नावाचे दुसरे एक खेडे आम्ही गाठले...तेथे "ऊमन्गॉट", नावाची अतिस्वच्छ,नितळ पाणी घेऊन वाहणारी आणि आपला  सुंदर तळ स्पष्टपणे दाखवणारी नदी वाहते....तेथे पोहोंचलो...तेथे 
 बोटींग करण्याची आमची हौस पुरी करणार होतो आम्ही!
     बोटीत बसून रपेट करताना नदीच्या तळाचे सौंदर्य उलगडत गेले...गार पाण्याला स्पर्श करत ते ओंजळीत भरून क्षितीजाआड लवकरच जाईल हा ...असे वाटणार्‍या सुर्यनारायणाला नकळतपणे अर्घ्यच दिले म्हणा ना!!
  
      आजच्या दिवसाची सहल एव्हाना शेवटच्या टप्प्यात आली होती....पण उत्सुकता होती ती भारत - बांगलादेश सीमा, त्यावर भारताकडून बांधण्यात आलेले तारेचे काटेरी कुंपण आणि मोठ्ठे गेट बघण्याची....
    अस्ताच्या समीप जाणारा सुर्य, लांबच लांब निर्मनुष्य रस्ता, दोन्ही बाजूंनी रिकामी सोडलेली विस्तीर्ण जागा आणि 'ते' प्रचंड मोठे गेट बघितले आणि आपल्या भारत मातेची सेवा करण्याचे कर्तव्य बजावणाऱ्या सुरक्षा रक्षकांचे (जवानांचे)
मनःपुर्वक आभार मानले....त्यांना "जयहिंद"म्हणत ही सीमा रेषा डोळ्यात भरभरून साठवून घेतली...
     वडिलोपार्जित घराचे दोन सख्ख्या भावांत होणारे पार्टिशन (वाटणी)असावी अशीच ती सीमारेषा होती....लांबच लांब नजरेच्या टप्प्यात न मावणारी....
उदासवाणी...पण भारतीयांचा देशाप्रती स्वाभिमान जागवणारी....
तिला पुनःश्च एकदा नमन करत आम्ही आमच्या मुक्कामी, शिलॉंग येथे परतावयास सुरुवात केली....

भाग पहिला. 👆

क्रमशः

🌹🌹🌹🌹🌹