या कोव्हिड 19 ने खूप जणांचे नातेवाईक, परिचित यांचा बळी घेतलाय....अशा प्रत्येक व्यक्तीस समर्पित आजची ही कविता...
*परिमळ*
आठवणींचा परिमळ घालतो भावनांना साद ....
का रे देवा बोलावतोस स्वतःकडे
माणसं अशीच खास....
जरी आमच्या दृष्टिआड मूर्ति त्यांची झाली.....
तरीही त्यांच्या आठवणींचा परिमळ
कायमच साथ करेल आमची....
घालवलेले क्षण क्षण त्यांच्या समवेतचे....
बहरुन येतील पुनःपुन्हा संदर्भासवे
घेवून गेलास मूर्ति
परि ठेवा आठवांचा....
सांभाळी घालून आमच्या
त्यांच्या सहवासाचा....
आठवांच्या सोबतीने आम्ही
जगू
नव्याने पुन्हा फिरुन
क्षण हसरे नाचरे घेऊन .....
आणिक
आठवांची गंधभारली फुले वेचून वेचून....
©️*नंदिनी*
🌹🌹🌹🌹🌹
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा